Author: rwpima

आंतरराष्ट्रीय

बांग्लादेशातील क्रांतिकारी विद्यार्थी आणि कष्टकरी जनतेच्या संघर्षाला सलाम !

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) बांग्लादेशातील क्रांतिकारी विद्यार्थी आणि कष्टकरी जनतेसोबत आपली एकता जाहीर करत आहे. आम्ही या आंदोलनातील राजकीयदृष्ट्या जागरुक विद्यार्थ्यांना-कष्टकऱ्यांना आग्रह करतो की त्यांनी आपली शक्ती ताबडतोब कामगार वर्गाच्या राजकीय पर्यायाच्या निर्मितीमध्ये लावावी ज्यामुळे अंततः बांग्लादेशातील कामगार वर्गाचा एक अग्रगण्य पक्ष निर्माण होईल ज्याच्याजवळ समाजवादाचा खरा क्रांतिकारी कार्यक्रम असेल.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

RWPI condemns the repression of Arundhati Roy and Dr. Sheikh Showkat Hussain!

Revolutionary Workers’ Party of India (RWPI) condemns the totally unjustified, politically motivated, undemocratic sanction by the Delhi Lieutenant-Governer Vinay Saxena to prosecute Arundhati Roy, noted writer and Dr. Hussain (former Professor, International Law at Central University of Kashmir) under the draconian UAPA law. This sanction comes 14 years later for a speech that took place in 2010 in Delhi. The reason for this sanction is to suppress all dissenting voices that go against the stated policy of the fascist regime, to send a message that the fascist policies will continue even under a minority BJP government, and to divert the attention away from the failures of the government in Kashmir after revocation of article 370.

Read More
Civil RightsDemocratic Rightsनागरी आणि लोकशाही हक्क

PROPOSED MAHARASHTRA PUBLIC SECURITY ACT YET ANOTHER ACT TO SUPPRESS VOICES OF DISSENT!

There is enough evidence to demonstrate that such laws exist only to suppress the voice of the political opponents. The conviction rate under Section 153A in 2020 was just 20.2, and even lower in some other laws. Conviction rate under UAPA based on persons arrested was only 2.8 percent. Such laws allows indefinite incarceration of the accused and the process itself becomes the punishment for innocents. The law has been under consideration for long time, because the state machinery is aware that it will be challenged in the courts and its implementation itself may create serious problems for any government. The dangers of the severe misuse of such a law, by police officials, successive governments, against their opponents it not only real, it is imminent, and proven so by history.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याविरुद्ध आयोजित धरणे आंदोलनाला भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) चा सक्रिय जाहीर पाठिंबा !

आम्ही भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत पोलिसांकडून करण्यात आलेल्या या बेकायदेशीर गुन्ह्याच्या कारवाई विरोधातील संघर्षात सोबत असल्याची भूमिका जाहीर करत आहोत. तसेच अशा प्रकारच्या सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील व लोकशाही अधिकाराच्या दमनाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष स्वतःला कर्तव्यबद्ध मानतो. जेव्हा सरकारद्वारे सर्वच विरोधी आवाजांना गप्प करण्यासाठी हुकूमशाही, दमन यांचा वापर केला जातो तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गालाच बसत असतो. म्हणून कामगार वर्गाने अशा सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात लढा उभारला पाहिजे.

Read More
Uncategorized

घाटकोपर (मुंबई) मध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू : जबाबदार शिदे-फडणवीस-पवार सरकार !!

जाहिराती आणि नफ्याच्या हव्यासापोटी भांडवली व्यवस्थेत सरकारी स्तरावर कामात होणारा दिरंगाईपणा अनेक वेळा सामान्य लोकांच्या जिवावर बेतत असतो अशीच ही घटना आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष संबंधित घटनेत मृत्यू पडले पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. तसेच राज्यातील शिदे-फडणवीस-पवार सरकारच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराचा निषेध करत आहे.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!

आज भांडवलदार वर्गाचे आंतरिक आर्थिक-राजकीय संकट तीव्र होत असताना, भांडवलदार वर्गाच्याच इतर नेत्यांचे दमन सुद्धा करण्याकडे तो जात आहे, आणि ईडी-सीबीआय सारख्या यंत्रणा वापरून एकाधिकारी फॅशिस्ट राजवटीला मजबूत केले जात आहे. “निर्भय बनो” सारख्या भांडवली/निम्न-भांडवली विचारांच्या कार्यक्रमांचे, आयोजकांच्या लोकशाही अधिकारांचे दमन केले जाते, तेव्हा अशा लोकशाही-नागरी अधिकारांच्या हननाचा फटका सर्वाधिक कामगार वर्गालाच बसत असतो, कारण अशाप्रकारे त्याच्याही अधिकारांवर हल्ला होत असतो. तेव्हा या अधिकारांच्या होणाऱ्या कोणत्याही हननाविरोधात बोलणे हे कामगार-कष्टकरी वर्गाचे कर्तव्य आहे . या घटनेनंतर उदारवादी भ्रम मनात बाळगणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींनी, कामगार-कष्टकऱ्यांनी सुद्धा फॅशिझमच्या खऱ्या चरित्रावर विचार केला पाहिजे, आणि सर्वधर्मसमभावाच्या नकली धर्मनिरपेक्षतेचे राग आळवणे बंद करून, तकलादू लोकशाही-नागरी संविधानिक अधिकारांच्या भरवशावर न बसता, आपली रस्त्यावरील शक्ती मजबूत करत फॅशिस्ट गुंडांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे.

Read More
Uncategorized

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असली पाहिजे?

प्रस्थापित दलाल कामगार युनियन्सना बाजूला सारून तसेच महामंडळ, राज्यसरकार आणि कोर्टाकडून टाकण्यात आलेल्या दबावाला न जुमानता आणि तात्कालिक तुटपुंज्या पगारवाढीचे गाजर न स्विकारता राज्य शासनात विलीनीकरणाची महत्वपूर्ण अशी राजकीय स्वरूपाची मागणी आपण निर्धाराने लावून धरली आहे. ही महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील एक अत्यंत महत्वाची घटना आहे! हा लढा एका निकराच्या क्षणाला पोहोचलेला असताना, आंदोलनाची आणि आपल्या एकंदरीत चळवळची पुढची दिशा काय असली पाहिजे याबद्दल आम्ही आपणास गांभीर्याने काही आवाहन करत आहोत.

Read More
Uncategorized

मनमानी पद्धतीने कलम 370 ला समाप्त करणे हा काश्मिरी जनतेशी केलेला ऐतिहासिक विश्वासघात

RWPI सर्व संघटक राष्ट्रांच्या स्वेच्छेच्या आधारावर सर्वाधिक शक्य अशा मोठ्या राज्याचे समर्थन करते आणि काश्मिरने वेगळे व्हावे ही इच्छा ठेवत नाही. परंतु प्रश्न कोणाच्या इच्छेचा किंवा अनिच्छेचा नाही. हे ठरवणे काश्मिरी लोकांचा अधिकार आहे की त्यांची नियती काय असावी, त्यामुळे त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे. मनमानी पद्धतीने कलम 370 समाप्त करून काश्मिरी जनतेसोबत ऐतिहासिक विश्वासघात करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा समाप्त करून जम्मू-काश्मिरला दिल्ली आणि पॉंंडेचरी सारख्या अपुऱ्या अधिकारांच्या विधानसभांसारखे आणि लडाखला चंडीगढ सारख्या विधानसभा रहीत केंद्र शासित प्रदेशामध्ये परिवर्तित करण्यात आले आहे. याचा अर्थ हा आहे की तिथे सरळ केंद्राचे शासन असेल जे सामान्य जनतेची परकेपणाची भावना अजून वाढवेल तसेच चौका-चौकात सैन्य तैनात ठेवूनच हे सरकार चालू शकेल. इतिहास सांगतो की सैन्याच्या जोरावर कोणत्याही छोट्या भागातील पूर्ण लोकसंख्यला दीर्घकाळापर्य़ंत दाबून ठेवणे शक्य नाही. काश्मिर सुद्धा याला अपवाद नसेल.

Read More
Uncategorized

भाजपच्या नेतृत्वातील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय फॅसिझम विरोधी संघर्षाच्या नवीन पर्वाची सुरूवात आहे. ही हताश-निराश होण्याची वेळ नाही.

हा कोणताही सामान्य भांडवली पक्ष नाही, तर एक फॅसिस्ट भांडवली पक्ष आहे. याच्यामागे कॅडरची एक विशाल संरचना आहे, जिला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने जाणतो. फॅसिस्ट विचारधारेवर आधारित हे कॅडर हीच भाजपची सर्वात मोठी शक्ती आहे. इतर सर्व भांडवली पक्ष, मग ते कॉंग्रेस असो, सपा-बसपा असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस वा तृणमूल, तेलगू देशम इत्यादी असोत, ते एका सचेतन विचारधारेवर आधारित आणि कॅडर वर आधारित पक्ष नाहीत. हेच कारण आहे की त्यांची संघटनात्मक रचनाही कधीच भाजप आणि संघ परिवाराच्या संघटनात्मक रचनेएवढी शिस्तबद्ध आणि प्रभावी असू शकत नाही. भाजप आपल्या अंधराष्ट्रवादी आणि धर्मवादी प्रचाराला जितक्या प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवू शकते, इतर सामान्य भांडवली पक्ष तितक्या प्रभावीपणे सामान्यत: हे काम करू शकत नाहीत.

Read More
Uncategorized

1 मे, कामगार दिन चिरायू होवो! जगातील कामगारांनो एक व्हा !

जगभरात ज्या काही घटनांनी मानवी समाजमनावर एक अमीट छाप सोडली आहे, कामगार-कष्टकऱ्यांच्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तने घडवून आणली आहेत, त्यापैकी एक घटना म्हणजे 1 मे चा शिकागो कामगारांचा लढा. याच दिवशी कामगार वर्गाच्या नायकांनी प्राणाहुती दिली, व कामाचे तास आठ यासह इतर श्रम-कायदे प्राप्त करून घेणाऱ्या आंदोलनांचा पाया घातला. 1 मे म्हणजे ‘मे दिवस’ कामगारांच्या याच झुंजार लढ्याला आणि बलिदानाला आठवण्याचा, त्यातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आज जेव्हा प्रत्येक क्षेत्रात 10-12 तास काम आणि दोन वेळ खायलाही पुरणार नाही इतका कमी पगार या स्थितीत कामगार कष्टकऱ्यांची पिळवणूक चालली आहे, कॉंग्रेस सरकार असो वा फासीवादी मोदी सरकार कामगार कायद्यांना मोडीत काढत आहेत व धनदांडग्या भांडवलदारांना चरायला कुरण मोकळे सोडणारे कायदे करत आहेत, अशा वेळी या लढ्यांची आठवण काढणे आणि त्यापासून प्रेरणा घेत कामगार कष्टकऱ्यांचे नवे लढे उभे करणे हे आपले कर्तव्य आहे.

Read More