फॅशिझम

Fascismफॅशिझम

पहलगाम हल्ला: फॅशिस्ट मोदी सरकार मृत्युंसाठी जबाबदार!

पहलगाम हल्ल्याच्या सर्व नागरिक बळींना आम्ही न्याय्य भरपाईची मागणी करतो. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आरएसएस-भाजप आणि गोदी मीडिया द्वारे धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पुरस्कृत राजकारणाला बळी पडता कामा नये. आम्ही ही मागणी करतो की भारतीय राज्यसत्तेने काश्मीरी जनतेचे दमन थांबवले पाहिजे! आम्ही भारताच्या जनतेला हे आवाहन करतो की या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या मोदी सरकारला धारेवर धरून जाब विचारावा!

Read More
CommunalismFascismफॅशिझमसांप्रदायिकता

धर्माध आणि अंधराष्ट्रवादाचे राजकारण हाणून पाडा ! बुलडोझर राज मुर्दाबाद! मालवण मधील पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे !

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष या मालवणमधील कष्टकरी कुटुंबावर झालेल्या बुलडोझर कारवाईचा तीव्र निषेध करत आहे. या प्रकरणात कायद्याची प्रक्रिया धाब्यावर बसवून मनमर्जीने दडपशाही करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहे. तसेच या कारवाईतून त्या कुटुंबाच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई केली पाहिजे अशी मागणी करत आहे. आम्ही मागणी करत आहोत की मढी येथील ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर घोषित केला जावा. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) महाराष्ट्रातील कामगार कष्टकरी जनतेला संघ-भाजप यांच्या धर्मांधतेच्या आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकारणाचे खरे चरित्र ओळखून त्याच्याशी संघर्ष करण्याचा आणि जाती धर्माच्या पलीकडे कामगार कष्टकऱ्यांची व्यापक एकता मजबूत करण्याचे आवाहन करत आहे.

Read More
Fascismफॅशिझम

महाराष्ट्रात महायुतीचा अपेक्षित मोठा विजय ! फॅशिझमला फक्त निवडणुकीच्या मार्गाने आव्हान देऊ पाहणाऱ्या उदारवाद्यांनी आत्मपरिक्षणाची गरज !

फॅशिस्ट शक्तींचे पुन्हा राज्यात सत्तेत येणे निश्चितपणे कामगार वर्गाकरिता मोठे आव्हान उभे करणार आहे. कामगार अधिकार, लोकशाही-नागरी अधिकार यांवरील हल्ला, जनांदोलनांचे दमन, प्रगतीशील व क्रांतिकारी विचारांचे दमन आता पुन्हा जोमाने पुढे जाणार आहे. या विरोधात जनतेच्या शक्तीला संघटित करण्याकरिता, फॅशिझमशी खऱ्या अर्थाने लढण्याकरिता, प्रगतीशील युवक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी मार्क्सवादाची कास धरल्याशिवाय आणि एका दीर्घकालिक लढ्याची पायाभरणी केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

RWPI condemns the repression of Arundhati Roy and Dr. Sheikh Showkat Hussain!

Revolutionary Workers’ Party of India (RWPI) condemns the totally unjustified, politically motivated, undemocratic sanction by the Delhi Lieutenant-Governer Vinay Saxena to prosecute Arundhati Roy, noted writer and Dr. Hussain (former Professor, International Law at Central University of Kashmir) under the draconian UAPA law. This sanction comes 14 years later for a speech that took place in 2010 in Delhi. The reason for this sanction is to suppress all dissenting voices that go against the stated policy of the fascist regime, to send a message that the fascist policies will continue even under a minority BJP government, and to divert the attention away from the failures of the government in Kashmir after revocation of article 370.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याविरुद्ध आयोजित धरणे आंदोलनाला भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) चा सक्रिय जाहीर पाठिंबा !

आम्ही भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत पोलिसांकडून करण्यात आलेल्या या बेकायदेशीर गुन्ह्याच्या कारवाई विरोधातील संघर्षात सोबत असल्याची भूमिका जाहीर करत आहोत. तसेच अशा प्रकारच्या सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील व लोकशाही अधिकाराच्या दमनाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष स्वतःला कर्तव्यबद्ध मानतो. जेव्हा सरकारद्वारे सर्वच विरोधी आवाजांना गप्प करण्यासाठी हुकूमशाही, दमन यांचा वापर केला जातो तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गालाच बसत असतो. म्हणून कामगार वर्गाने अशा सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात लढा उभारला पाहिजे.

Read More
Civil RightsDemocratic RightsFascismनागरी आणि लोकशाही हक्कफॅशिझम

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!

आज भांडवलदार वर्गाचे आंतरिक आर्थिक-राजकीय संकट तीव्र होत असताना, भांडवलदार वर्गाच्याच इतर नेत्यांचे दमन सुद्धा करण्याकडे तो जात आहे, आणि ईडी-सीबीआय सारख्या यंत्रणा वापरून एकाधिकारी फॅशिस्ट राजवटीला मजबूत केले जात आहे. “निर्भय बनो” सारख्या भांडवली/निम्न-भांडवली विचारांच्या कार्यक्रमांचे, आयोजकांच्या लोकशाही अधिकारांचे दमन केले जाते, तेव्हा अशा लोकशाही-नागरी अधिकारांच्या हननाचा फटका सर्वाधिक कामगार वर्गालाच बसत असतो, कारण अशाप्रकारे त्याच्याही अधिकारांवर हल्ला होत असतो. तेव्हा या अधिकारांच्या होणाऱ्या कोणत्याही हननाविरोधात बोलणे हे कामगार-कष्टकरी वर्गाचे कर्तव्य आहे . या घटनेनंतर उदारवादी भ्रम मनात बाळगणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींनी, कामगार-कष्टकऱ्यांनी सुद्धा फॅशिझमच्या खऱ्या चरित्रावर विचार केला पाहिजे, आणि सर्वधर्मसमभावाच्या नकली धर्मनिरपेक्षतेचे राग आळवणे बंद करून, तकलादू लोकशाही-नागरी संविधानिक अधिकारांच्या भरवशावर न बसता, आपली रस्त्यावरील शक्ती मजबूत करत फॅशिस्ट गुंडांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे.

Read More