Uncategorized

Uncategorized

1 मे, कामगार दिन चिरायू होवो! जगातील कामगारांनो एक व्हा !

जगभरात ज्या काही घटनांनी मानवी समाजमनावर एक अमीट छाप सोडली आहे, कामगार-कष्टकऱ्यांच्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तने घडवून आणली आहेत, त्यापैकी एक घटना म्हणजे 1 मे चा शिकागो कामगारांचा लढा. याच दिवशी कामगार वर्गाच्या नायकांनी प्राणाहुती दिली, व कामाचे तास आठ यासह इतर श्रम-कायदे प्राप्त करून घेणाऱ्या आंदोलनांचा पाया घातला. 1 मे म्हणजे ‘मे दिवस’ कामगारांच्या याच झुंजार लढ्याला आणि बलिदानाला आठवण्याचा, त्यातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आज जेव्हा प्रत्येक क्षेत्रात 10-12 तास काम आणि दोन वेळ खायलाही पुरणार नाही इतका कमी पगार या स्थितीत कामगार कष्टकऱ्यांची पिळवणूक चालली आहे, कॉंग्रेस सरकार असो वा फासीवादी मोदी सरकार कामगार कायद्यांना मोडीत काढत आहेत व धनदांडग्या भांडवलदारांना चरायला कुरण मोकळे सोडणारे कायदे करत आहेत, अशा वेळी या लढ्यांची आठवण काढणे आणि त्यापासून प्रेरणा घेत कामगार कष्टकऱ्यांचे नवे लढे उभे करणे हे आपले कर्तव्य आहे.

Read More
Uncategorized

बबन सोपान ठोके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

प्रस्थापित सर्व पक्ष हे भांडवलदार वर्गाच्या कोणत्या ना कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि निवडणुकीमध्ये जात, धर्म,भाषा,प्रांत,अस्मिता, पैसा , दारू अशामाध्यमांचा वापर करून जनतेला भुलवण्याचे काम ते आजपर्यंत करत आलेले आहेत; परंतु आता भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या स्वरूपात जनतेमध्ये एक खरा क्रांतिकारी कामगार वर्गीय पर्याय उपलब्ध आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष भांडवलदार वर्गाच्या कुठल्याही हिश्याकडून एक पैसाही निधी घेत नाही आणि पूर्णपणे सामान्य कष्टकरी मेहनती जनतेच्या घामाच्या कमाईतून उभा राहिलेला पक्ष आहे.

Read More
Uncategorized

उत्तर-पूर्व मुंबई सीटवर भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार बबन सोपान ठोके यांच्या थापी (करणी) चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करा

उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहणारी मोठी लोकसंख्या ही कष्टकरी-कामगार आहेत; जे मुंबईला बनवण्याचे आणि चालवण्याचे काम करतात. पण त्यांनाच नरकापेक्षाही वाईट स्थितीमध्ये वस्त्यांमध्ये मुलभूत मानवी सुविधांपासून वंचित रहावे लागते. उत्तर-पूर्व मुंबईचा मानखुर्द भाग जेथे जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात, तेथेच मोठ्या संख्येने टीबीसारख्या धोकादायक रोगांनी लोक ग्रस्त आहेत. याच कष्टकरी जनतेला धर्म किंवा जाती आधारित अस्मितेच्या राजकारणात अडकवले जाते ज्यामुळे ती आपल्या खऱ्या मागण्यांपासून आणि मुद्यांपासून दूर जाते. याच गोष्टींना समोर ठेवून कष्टकरी जनतेच्या खऱ्या मुद्यांवर आम्ही निवडणूक लढवत आहोत.

Read More