कष्ट्कऱ्यांना ओबीसी-मराठा वादात अडकवून महाराष्ट्रात सरकारने केले कामाचे 12 तास!
12 तास कामाच्या कायद्याला आपण निकराने विरोध केलाच पाहिजे! आपल्या कामगार भावा-बहिणींच्या रक्ता-घामाच्या किमतीतून मिळालेला 8 तासांचा कार्यदिवस तर आपण टिकवलाच पाहिजे, परंतु आता कामाचे तास 6 करण्याकरिता लढा उभारला पाहिजे! आपण आमदारांना जबाबदार धरले पाहिजे व जेव्हा विधानसभेत हे विधेयक आणले जाईल, तेव्हा त्यांनी याविरुद्ध मतदान केले पाहिजे अशी मागणी केली पाहिजे. आज गरज आहे की मोठ्या संख्येने एकजूट होऊन, रस्त्यांवर उतरून, झुंजार लढे उभे करून, या निर्णयाला मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे!
Read More